रविवार, २ जानेवारी, २०२२

भीमा कोरेगाव युद्ध - पेशवाईचा अस्त

 

तुम्ही 'थ्री हण्ड्रेड' हा सिनेमा पाहिला असेल. ह्या हॉलिवूड सिनेमात ३०० लोकांनी हजारो लोकांचा पराभव करताना दाखविला आहे. अर्थात तो पराभव ते ३०० लोक करत नाहीत तर नन्तर येणारे हजारो सैनिक शत्रूचा पराभव करतात. ह्या चित्रपटात त्या ३०० लोकांचा मृत्यू होतो पण शत्रूला ते आपल राज्य जिंकू देत नाहीत. ते राज्याच्या चिंचोळ्या प्रवेशद्वारावरच शत्रूच्या लाखो सैनिकांना अडकवून ठेवतात. मरण पत्करतात पण शत्रूला राज्य जिंकू देत नाहीत. हा चित्रपट ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे. पर्शिया व ग्रीस मध्ये इ.स.पू. ४२८ मध्ये झालेल्या या युद्धाला "थर्मोपिलाईचे युद्ध" म्हणतात.


'कर्नल टॉड' यांनी कोरेगावंच्या लढाईचे वर्णन सुद्धा "थर्मोपिलाईची लढाई" अश्या गौरवपूर्ण शब्दात केले आहे.
अस वर्णन या लढाईच करण्यामागच कारण दोन्ही ठिकाणी असणारी समान परिस्थिती आहे.

एका बाजूला दुसऱ्या बाजीरावाच २८००० सैन्य व दुसऱ्या बाजूला ५०० ब्रिटिश सैनिक. दुसऱ्या बाजीरावाने पुणे परत मिळवण्याच्या हेतूने पुणे वर हल्ला केला होता. तेथे असलेल्या कर्नल 'बर' या इंग्रजी अधिकार्याकडे फारसे सैनिक नव्हते त्यामुळे जवळपास शिरूर या ठिकाणी कॅप्टन स्टोटंन याला त्याने मदतीसाठी बोलावले. कॅप्टन स्टोटंन हा ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री पुण्याकडे निघाला. त्याच्याकडे जी बटालियन होती त्या बटालियन मध्ये बहुतांश महार होते. २५ मैलांचा रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे भीमा नदीच्या तीरावर ही बटालियन पोहोचली. तेव्हा पेशव्यांच  प्रचंड सैन्य नदीच्या दुसऱ्या तीरावर होतं. पेशव्याशी लढता यावे म्हणून कॅप्टन स्टोटंनन कोरेगावचा आश्रय घेतला. कॅप्टन स्टोटंन दिसताच पेशव्याने बापू गोखले यास इंग्रजावर हल्ला करण्यास सांगितले. अशा रीतीने १ जानेवारी १८१८ ला सकाळी लढाईला सुरुवात झाली.या लढाईत महार सैनिकांनी मोठ्या हिंमतीने लढून पेशव्यांच्या सैन्याचा उपाशी पोटी व रात्रभर चालून दमलेले असताना सुद्धा पराभव केला.  रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला. या लढाईत इंग्रजांचे २७५सैनिक ठार झाले तर पेशव्यांचे ७००-८०० सैनिक ठार झाले.

या लढाईच्या प्रित्यर्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला त्यावर त्या लढाईत जे शहिद झाले त्यांची नावे कोरली आहेत.


ब्रिटीशाचा एक सैनिक तर पेशव्याचे ५६ सैनिक समोरासमोर होते म्हणून तुझ्यासारखे छप्पन पाहिले ही म्हण अस्तित्वात आली असण्याची शक्यता आहे. ज्यांना म्हणी कशा निर्माण होतात हे समजते त्यांना हे पटू शकेल.

पण महार ब्रिटिशांच्या बाजूने का लढले ???

याची कारणे अज्ञात आहेत. कदाचित पोटासाठी लढले असतील. सर्व राजे महाराजे देखील पोटासाठीच लढतात. मग यात काय विशेष.

कदाचित त्यांना इंग्रजी लष्करात देशी लष्करापेक्षा जास्त मान आणि धन सुद्धा मिळाला असावा

तिसरे कारण उत्तर पेशवाईत जातिभेदाच स्तोम खूप माजले होते. महारांवर दुसऱ्या बाजीरावाचा जास्त राग दिसून येतो. याचा प्रभाव या युद्धावर कदाचित पडला असावा.

ब्रिटिशांच्या बाजूने लढण्याचा महारांना काय फायदा झाला ???

ब्रिटिश सैन्यात दाखल झाल्यामुळे महारांना थोडाफार चांगला पगार व मान नक्कीच मिळाला असणार परंतु लवकरच त्यांचा पुढील सर्व युद्धात वापर करून घेतल्या नन्तर त्यांची भरती बंद करण्यात आली. कारण आता उच्चवर्णीय लोक ब्रिटिशांच्या सैन्यात जात होते. त्यामुळे महार अधिकार्याच उच्चवर्णीय सैनिक आदेश पाळणार नाहीत व त्यामुळे सैन्यात अनुशासन राहणार नाही या कारणाने महार सैनिकांची भरती इंग्रजानी बंद केली.

अश्या प्रकारे प्राचीन मध्ययुगीन काळाबरोबर इंग्रजी काळात देखील महारांचा निव्वळ वापर करून फेकून देण्यात आला. आजसुद्धा विविध पक्ष आजच्या बौद्धांचा अशाच प्रकारे वापर करून फेकून देतात हे अजूनही बौद्धांना कळत नाही. हे जेव्हा कळेल तो सुदिन असेल.

आजच्या घडीला या लढाईचे महत्व काय ???

लढणे हा फक्त क्षत्रियांचा विषय आहे ही अंधश्रद्धा गेल्या काही वर्षांत पसरली आहे. क्षत्रिय म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन होती अश्या लोकांना क्षत्रिय गण म्हणत. जमिनीचे मालक स्वाभाविक राजे होत असत म्हणून क्षत्रिय हा राजा असतो. क्षत्रिय ही व्याख्या लढण्याशी संबंधित नाही. ती राज्य करण्याशी संबंधित आहे. लढण्यासाठी किंवा मरण्यासाठी शूद्र अतिशूद्रांचा वापर होत होता.
भीमा कोरेगाव युद्धातून जातीचा अभिमान मिरवण्यापेक्षा अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय लोकांच्या मनातील न्यूनगंड काढण्यासाठी या लढाईच स्मरण केलं तरी पुरेसे आहे.

येणार युग युद्धाने नव्हे तर बुद्धीने (बुद्धाने) आपल्याला जिंकायचं आहे हे मात्र लक्षात असू द्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा   रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खाल...